भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 65 वा महापरिनिर्वाण दिन. यापार्श्वभूमीवर त्यांच्याविषयीच्या विशेष गोष्टी जाणून घेऊयात…
संपादित केलेल्या पदव्या : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 32 पदव्या संपादित केल्या होत्या. त्यामध्ये बीए, एमए, Phd (अर्थशास्त्र), एमएससी (Provincial Decentralization of Imperial Finance in British India), बॅरिस्टर इन लॉ, डीएससी (The Problem of the Rupee – Its origin and its solution), एलएलडी (HIS achievements, Leadership and authoring the constitution of India), डी.लिट. यासारख्या अनेक महत्वाच्या पदव्यांचा समावेश आहे.
लिहिलेले महत्वाचे ग्रंथ : Caste in Hindu (1916), The problem of Rupee (1923), Annhilation of Caste (1935), Federation Versus Freedom (1939), Ranade, Gandhi and Ginnah (1943), Communal Deadlock and a Way to solve it (1945), What congress and Gandhi have done to the untouchables? (1945), Pakistan or Partition of India (1945), State and Minorities (1947), Maharashtra as a Linguistic state (1948), The untouchable (1948), Who were shudra (1945), Buddha and his Dhammas (1957).
सुरु केलेली वर्तमानपत्रे : मूकनायक (1920), बहिष्कृत भारत (1927), समता (1928), जनता (1930), प्रबुद्ध भारत (1956, जनताचे नामांतर).
महत्वाचे सत्याग्रह/ आंदोलने : महाडचे चवदार तळे सत्याग्रह, (20 मार्च 1927), मनुस्मृती दहन (25 डिसेंबर 1927), शेतकऱ्यांची चळवळ (1928), पर्वती देवालय प्रवेश (1929), काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह (1931), पुणे करार (1932), येवला परिषद (1935), बौद्ध धर्मात प्रवेश (14 ऑक्टोबर 1956), बावीस प्रतिज्ञा.
स्थापन केलेल्या महत्वपूर्ण संस्था/ संघटना : बहिष्कृत हितकारिणी सभा (1924), समता सैनिक दल (1927), स्वतंत्र मजूर पक्ष (1936), शेड्युल कास्ट फेडरेशन (1942), पिपल्स एज्युकेशन सोसायटी (1945), भारतीय बौद्ध महासभा (1955).
गाजलेल्या घोषणा :
● मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो, ते माझ्या हाती नव्हते.
● हिंदू म्हणून मी जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही.
● जे आपला इतिहास विसरतात ते कधीही इतिहास घडवू शकत नाहीत.
● शिका, संघटित व्हा, संघर्ष करा.
● स्वातंत्र, समता, बंधुता शिकवणाराच धर्म मला प्रिय वाटतो.
● जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असायला हवे.
मिळालेले पुरस्कार / सन्मान :
● 1955 : ‘बोधीसत्व’ उपाधी प्रदान
● 1990 : ‘भारतरत्न’
बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू :
● चित्रकार : बी. आर. मडिलगेकर यांच्याकडून त्यांनी चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले होते.
● व्हायोलिन : त्यांना व्हायोलिन वाजवण्याची आवड होती.
● पत्रकार : त्यांचे नाव तत्कालीन ब्राह्मणेतर पत्रकारितेत अग्रस्थानी घेतले जाते.
● राजकारणी : ते भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. तसेच ते स्वतंत्र भारताचे पहिले मजूर मंत्रीही होते.
● अर्थतज्ज्ञ : ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या त्यांच्या ग्रंथातून प्रेरणा घेऊन 1935 साली भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली होती.
● तत्वज्ञ : स्वातंत्र, समता आणि बंधुता या तत्वांवर विश्वास ठाम विश्वास असणाऱ्या बाबासाहेबांनी हीच तत्वे राज्यघटनेत समाविष्ट केली.
फारशा चर्चिल्या न गेलेल्या गोष्टी :
● दुसऱ्या महायुद्धानंतर भारताची आर्थिक घडी बसवण्यात त्यांचे मोठे योगदान होते. त्यासाठी नेमलेल्या रिकन्स्ट्रक्शन कमिटी ऑफ काऊन्सिलचे (आरसीसी) सदस्य होते.
● तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी त्यांच्यावर सिंचन आणि विजेच्या प्रश्नांबाबत जबाबदारी सोपवली होती.
● ‘दामोदर नदी खोरे’ आणि ‘सोने नदी खोरे’ प्रकल्प तसेच देशातील सर्वात मोठ्या ‘हिराकुड धरण’ प्रकल्पाचे काम बाबासाहेबांच्या अखत्यारित झाले होते.
● भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत आणि लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी)च्या स्थापनेत त्यांचा मोठा वाटा होता.
● ‘जय भीम’ च्या घोषणेनंतर देशात ‘जय हिंद’ ही घोषणा सुरु झाली होती.
प्रचंड लेखन : त्यांचे पूर्ण झालेले एकूण 22 ग्रंथ आणि पुस्तिका आहेत. 10 अपूर्ण राहिलेले ग्रंथ, 10 निवेदने किंवा साक्षीपुरावे, 10 शोधनिबंध, लेख आणि परीक्षणं इतके प्रचंड लिखाण त्यांनी केले आहे. त्यांनी हे सर्व लिखाण इंग्रजीतून केलेले आहे.

from https://ift.tt/3GxTOrV

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *