
मिठाईचा उल्लेख झाला की, गुलाब जामुनची चर्चा होतेच. परंतु तुम्ही कधी असा विचार केलाय का? त्याला गुलाब जामुन असे का म्हटले जाते? हे नाव देण्यामागचे नेमके कारण काय? चला, तर जाणून घेऊयात…
इतिहास सांगतो, गुलाब जामुनचे नाव पर्शियाशी संबंधित आहे. पर्शियन शब्दसंग्रहानुसार, गुलाब हा दोन शब्दांपासून बनलेला आहे. एक ‘गुल’ म्हणजे फूल आणि दुसरा शब्द ‘आब’ म्हणजे पाणी. थोडक्यात गुलाबाच्या सुगंधाचे गोड पाणी. त्याला तेव्हा तिथे गुलाब असे म्हणत. खव्यापासून गोळ्या बनवल्या जात, ज्याचा रंग गडद होईपर्यंत तळले जात. याची तुलना जामुनशी होते. त्यामुळे याला ‘गुलाब जामुन’ हे नाव पडले.
एक सिद्धांत सांगतो की, गुलाब जामुन सर्वात अगोदर मध्ययुगात इराणमध्ये तयार करण्यात आला. ज्याला तुर्की लोकांनी नंतर भारतात आणले. तर दुसरा सिद्धांत म्हणतो, एकदा चुकून मुघल सम्राट शाहजहानच्या स्वयंपाक्याने तो तयार केला होता. ज्याला लोकांनी पसंती दर्शवली. हळूहळू ते भारतातील प्रत्येक राज्यात प्रसिद्ध झाला.
हा गोड पदार्थ अनेक नावांनी ओळखला जातो. पश्चिम बंगालमध्ये याला पंटुंआ, गोलप जाम आणि कालो जाम म्हटले जाते. मध्य प्रदेशातील जबलपूर गुलाब जामुनसाठी प्रसिद्ध आहे. जबलपूर, कटंगी येथे सुरकुत्याचे रसगुल्ले प्रसिद्ध आहेत आणि ते आकारानेही खूप मोठे आहेत.
गुलाब जामुनची राजस्थानशी संबंधित आणखी एक मनोरंजक गोष्ट आहे. या ठिकाणी गुलाब-जामुनची भाजी केली जाते. तर साखरेऐवजी मसाल्यांसोबत ड्रायफ्रूट्स आणि टोमॅटोचा वापर होतो.
from https://ift.tt/3I1NnPf